Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

कुकडीच्या आवर्तनाचा 9 एप्रिलला फैसला

कुकडीच्या आवर्तनाचा 9 एप्रिलला फैसला

श्रीगोंदा । वीरभूमी- Apr 01, 2021 • 12:00 AM 1797 views
कुकडीचे आवर्तन सोडण्याकरीता 9 एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरीत पावले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय त्वरीत घेतला जावा.

यासाठी आपण सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. आता पुण्यात या संदर्भात बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यात आवर्तनाचा विषय मार्गी लागेल. पाण्याची उपलब्धता व वापर याबाबत श्रीगोंद्यावर अन्याय होणार नाही, याची लोकप्रतिनिधी म्हणून दक्षता घेतली जाईल.

विसापूर कालव्याखालील शेतकर्‍यांना पाणी मिळावे, या मागणीसाठी 5 एप्रिल रोजी श्रीगोंद्यात कुकडी विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

घोडद्वारे नदीवरील बंधार्‍यात पाणी सोडण्याची मागणी आपण यापूर्वी केली होती. सरकारने याची दखल घेतली आहे. 5 एप्रिल रोजी शिरूरचे आमदार अशोक पवार व माझ्या उपस्थितीत घोडमधून बंधार्‍यात पाणी सोडण्यात येणार आहे.

त्याचा फायदा श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील नदी काठच्या शेतकर्‍यांना होईल, असा दावा श्री. पाचपुते यांनी निवेदनात केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply