पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्याचा मृत्यू
निवडुंगे येथील घटना । शेतात काम करताना कोसळले; उपचारापूर्वीच मृत्यू
तालुक्यातील वाढत्या उन्हाचा कडाका जीवघेणा ठरत असून, तालुक्यातील निवडुंगे येथे उष्माघाताने एका तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राधाकृष्ण रामचंद्र मरकड (वय 33) असे मृत तरुण शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मरकड कुटुंबाचा शेती व्यवसाय असून शेतीची कामे करत असताना तापमान 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान गेले होते. कडक उन्हात काम करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चक्कर येऊन ते शेतातच कोसळले. ही बाब लक्षात येताच इतरांनी तत्काळ धाव घेतली. त्यांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले.
प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती उपस्थितांकडून मिळाली.
यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून उष्माघात, निर्जलीकरण व थकव्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागातील शेतमजूर व नागरिकांना दुपारच्या वेळेत काम करावे लागत असल्याने धोका अधिक वाढला आहे.
मरकड कुटुंबाचा शेती व्यवसाय असून शेतीची कामे करत असताना तापमान 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान गेले होते. कडक उन्हात काम करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चक्कर येऊन ते शेतातच कोसळले. ही बाब लक्षात येताच इतरांनी तत्काळ धाव घेतली. त्यांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले.
प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती उपस्थितांकडून मिळाली.
यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून उष्माघात, निर्जलीकरण व थकव्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागातील शेतमजूर व नागरिकांना दुपारच्या वेळेत काम करावे लागत असल्याने धोका अधिक वाढला आहे.