Skip to content
Breaking Live
पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार हरवलेल्या ‘गंगू उर्फ शोभा’ची पावशतकानंतर घरवापसी घरात एकटी असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण शेवगावात महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध वाढवण बंदरात 1200 एकरावर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! प्रताप ढाकणेंचा ‘जय श्रीराम’चा नारा तर आ. राजळेंनी वाजविलेला ढोल चर्चेत त्या मृतदेहाबाबत पोलिसांची महत्वाची माहिती कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार हरवलेल्या ‘गंगू उर्फ शोभा’ची पावशतकानंतर घरवापसी घरात एकटी असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण शेवगावात महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध वाढवण बंदरात 1200 एकरावर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! प्रताप ढाकणेंचा ‘जय श्रीराम’चा नारा तर आ. राजळेंनी वाजविलेला ढोल चर्चेत त्या मृतदेहाबाबत पोलिसांची महत्वाची माहिती कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा

टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास अमरापूर येथे रस्ता रोको करण्याचा शेतकर्‍यांचा इशारा

शेवगाव । वीरभूमी - Apr 08, 2026 • 03:43 PM 11 views
मुळा पाटबंधारे विभागाअंतर्गत मुळा उजवा वितरिका क्रमांक 3 कलव्यामधून सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनात टेलच्या भागाला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमरापूर उपविभागीय अधिकारी संदीप शेळके यांच्यावर टेल भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

वरील भागाकडे पाणी वळवले जात असल्यामुळे टेलच्या भागातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून शेतकर्‍यांच्या हातात तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

पाणी वाटपासाठी टेल टू हेड हे धोरण असताना देखील आव्हाणे खुर्द, वडूले, अमरापूर, फलकेवाडी, भगूर या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.

पाणी प्रश्न हा शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून याकडे लोकप्रतिनिधी-आमदार, खासदार तसेच संबंधित अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाणी न आल्यास अमरापूर येथे आव्हाणे खुर्द, शहापूर, फलकेवाडी व अमरापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हा इशारा सद्गुरूआई पाणी वापर संस्थेचे चेअरमन देविदास काकडे, शंकरराव काकडे, संजय भुसारी, चंद्रकांत काकडे, किशोर सोंडे, किसन काकडे, दिलीप भुसारी, अशोक भुसारी, योगेश काकडे, निलेश काकडे, गणेश कमानदार, राजेंद्र काकडे, महादेव कमानदार, संतोष फटांगडे, कोंडीराम आहेर, नारायण लांडे, ऋषी पवार, बंडू औटी आदींनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply