टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास अमरापूर येथे रस्ता रोको करण्याचा शेतकर्यांचा इशारा
मुळा पाटबंधारे विभागाअंतर्गत मुळा उजवा वितरिका क्रमांक 3 कलव्यामधून सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनात टेलच्या भागाला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमरापूर उपविभागीय अधिकारी संदीप शेळके यांच्यावर टेल भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
वरील भागाकडे पाणी वळवले जात असल्यामुळे टेलच्या भागातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून शेतकर्यांच्या हातात तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
पाणी वाटपासाठी टेल टू हेड हे धोरण असताना देखील आव्हाणे खुर्द, वडूले, अमरापूर, फलकेवाडी, भगूर या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.
पाणी प्रश्न हा शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून याकडे लोकप्रतिनिधी-आमदार, खासदार तसेच संबंधित अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाणी न आल्यास अमरापूर येथे आव्हाणे खुर्द, शहापूर, फलकेवाडी व अमरापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हा इशारा सद्गुरूआई पाणी वापर संस्थेचे चेअरमन देविदास काकडे, शंकरराव काकडे, संजय भुसारी, चंद्रकांत काकडे, किशोर सोंडे, किसन काकडे, दिलीप भुसारी, अशोक भुसारी, योगेश काकडे, निलेश काकडे, गणेश कमानदार, राजेंद्र काकडे, महादेव कमानदार, संतोष फटांगडे, कोंडीराम आहेर, नारायण लांडे, ऋषी पवार, बंडू औटी आदींनी दिला आहे.
वरील भागाकडे पाणी वळवले जात असल्यामुळे टेलच्या भागातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून शेतकर्यांच्या हातात तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
पाणी वाटपासाठी टेल टू हेड हे धोरण असताना देखील आव्हाणे खुर्द, वडूले, अमरापूर, फलकेवाडी, भगूर या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.
पाणी प्रश्न हा शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून याकडे लोकप्रतिनिधी-आमदार, खासदार तसेच संबंधित अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाणी न आल्यास अमरापूर येथे आव्हाणे खुर्द, शहापूर, फलकेवाडी व अमरापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हा इशारा सद्गुरूआई पाणी वापर संस्थेचे चेअरमन देविदास काकडे, शंकरराव काकडे, संजय भुसारी, चंद्रकांत काकडे, किशोर सोंडे, किसन काकडे, दिलीप भुसारी, अशोक भुसारी, योगेश काकडे, निलेश काकडे, गणेश कमानदार, राजेंद्र काकडे, महादेव कमानदार, संतोष फटांगडे, कोंडीराम आहेर, नारायण लांडे, ऋषी पवार, बंडू औटी आदींनी दिला आहे.