‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय
दोन जागेसाठी झाले होते मतदान । आ. राजळेंचे निर्विवाद वर्चस्व कायम
तालुक्याची कामधेनू म्हणुन ओळख असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक संचालक मंडळाच्या कासार पिंपळगाव गटाच्या दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाने विजय मिळवला आहे. या अगोदर 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामुळे आ. राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने सर्वच्या सर्व 19 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.
ऊस उत्पादक मतदारसंघातील कासार पिंपळगाव गटाच्या दोन जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे शुक्रवारी मतदान झाले होते. 8708 सभासद मतदारांपैकी 5680 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कासार पिंपळगाव गटातून सत्ताधारी आदिनाथ शेतकरी मंडळाकडून आप्पासाहेब राजळे व उद्धव वाघ हे तर विरोधी गटाकडून शिवशंकर राजळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन जागेसाठी शुक्रवारी मतदान होवून आज शनिवारी सकाळी पाथर्डी तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली.
यामध्ये आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार आप्पासाहेब राजळे यांना 4932 व उद्धव वाघ यांना 4158 ईतके मते पडून विजयी झाले. तर विरोधी शिवशंकर राजळे यांना 1642 मतांवर समाधान मानावे लागले. बॅलेटपेपर वर मतदान झाल्याने एकुण 67 मते बाद ठरली. मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर राजळे समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
यापुर्वीच सत्ताधारी आ. मोनिका राजळे गटाने 17 जागा बिनविरोध मिळवल्या होत्या. आता उर्वरीत दोन जागांही भरघोस मतांनी जिंकल्याने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी काम पाहिले तर त्यांना तहसीलदार उद्धव नाईक यांनी सहाय्य केले.
ऊस उत्पादक मतदारसंघातील कासार पिंपळगाव गटाच्या दोन जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे शुक्रवारी मतदान झाले होते. 8708 सभासद मतदारांपैकी 5680 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कासार पिंपळगाव गटातून सत्ताधारी आदिनाथ शेतकरी मंडळाकडून आप्पासाहेब राजळे व उद्धव वाघ हे तर विरोधी गटाकडून शिवशंकर राजळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन जागेसाठी शुक्रवारी मतदान होवून आज शनिवारी सकाळी पाथर्डी तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली.
यामध्ये आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार आप्पासाहेब राजळे यांना 4932 व उद्धव वाघ यांना 4158 ईतके मते पडून विजयी झाले. तर विरोधी शिवशंकर राजळे यांना 1642 मतांवर समाधान मानावे लागले. बॅलेटपेपर वर मतदान झाल्याने एकुण 67 मते बाद ठरली. मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर राजळे समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
यापुर्वीच सत्ताधारी आ. मोनिका राजळे गटाने 17 जागा बिनविरोध मिळवल्या होत्या. आता उर्वरीत दोन जागांही भरघोस मतांनी जिंकल्याने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी काम पाहिले तर त्यांना तहसीलदार उद्धव नाईक यांनी सहाय्य केले.