Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

वर्षे भरानंतरही शिवसैनिकांना तालुकास्तरावर नियोजनात सामावून घेतले जात नाही

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांची खंत

कोपरगाव । वीरभूमी- Apr 17, 2021 • 12:00 AM 750 views
महाविकास आघाडीचे सरकार येऊन एक वर्ष होऊन गेले परंतु ग्रामीण भागातील शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकार्‍यांना तालुकास्तरावर शासकीय नियोजनात सामावून घेतले जात नसल्याची खंत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री कोपरगाव येथे आले व कृष्णाई मंगल कार्यालयात मिटींग झाली पण ज्येष्ठ शिवसैनिकांना कोणालाही माहीत नाही. म्हणायला सरकार आपले आहे पण शिवसैनिकांना काडीचा उपयोग नाही.

या अगोदर युती सरकार होते. तेव्हा कोपरगाव (कोल्हे) भाजपने पुरेपुर फायदा करुन घेतला आणि आता आघाडी सरकारचा फायदा तालुक्यात राष्ट्रवादी घेत आहे. सरकार कोणाचेही असो अधिकार्‍यांना फक्त काळे-कोल्हेच माहीत आहेत. आम्हा शिवसैनिकांना व माजी पदाधिकारी यांना कोणतेही निमंत्रण दिले जात नाही.

तालुक्यात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी अनेक शिवसैनिकांचे योगदान आहे. पण त्याचा विसर सर्वांना पडला आहे. तालुक्यात कित्येक शिवसैनिक आहे. पक्ष वाढीसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे.

निदान त्यांचा तरी विचार व्हावा, असे मला वाटते. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या म्हणी प्रमाणे सध्या चालू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामीण भागातील शिवसैनिकांना तालुकास्तरावर न्याय मिळणे गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री छगन भुजबळ कोपरगाव येथे आले असता देखील ग्रामीण भागातील सेनेच्या पदाधिकारी यांना सांगितले नाही.

प्रत्येकवेळी आम्हा शिवसैनिकांना डावलण्यात येणार असेल तर आपण या संदर्भात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल केला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घालणार असल्याचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply