Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आता दुचाकीवरून प्रवास करतांनाही पाळा हे निर्बंध

नाहीतर होईल कारवाई । जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अहमदनगर । वीरभूमी - May 01, 2021 • 12:00 AM 3969 views
अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना करत आहे. मात्र कोरोना संसर्ग थांबत नाही. याचे कारणही तसेच आहे. कारण अनेक लोक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरतांना आढळून येतात. ही बाब जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एका आदेशाने दुचाकी चालकांवरही निर्बंध घातले आहेत.

यामुळे दुचाकी चालकाला दि. 2 मे ते 15 मे या काळात वैद्यकीय कारण वगळता दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवासास मनाई करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोरोना सनसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या केल्या जात आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाठीमागे जाहीर केलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवा व आदेशात नमुद इतर बाबी वगळता निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तथापि, सूट असलेल्या सेवांकरीता मोठ्या प्रमाणात दुचाकीवर दोन व्यक्ती फिरत असल्याचे निदर्शनास आलेली आहे. तथापि, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी दुचाकीवर एक पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवासास मनाई करणे आवश्यक आहे.

यामुळे जिल्ह्यामध्ये दि. 2 मे 2021 ते दि. 15 मे 2021 या कालावधीत वैद्यकीय कारण वगळून दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्तीस प्रवासास मनाई करण्यात आली आहे.

याचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियमन 1897 मधील तरतुदीनुसार भादंवि कलम 1860 च्या कलम 188 नुसार दंडात्मक अथवा कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply