जिल्ह्याला मोठा दिलासा; कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
पाथर्डी तालुका वगळता इतर तालुके शंभरच्या आत
अहमदनगर जिल्ह्याला बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे. एक दिवस कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ तर एक दिवस कमी असा पाठशिवणीचा खेळ सुरू असतांना आज नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज बुधवारी मंगळवारच्या तुलनेत 294 ने घट झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 858 कोरोना बाधित आढळले आहेत. आज आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा हजाराच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज बुधवारी दरदिवशी आढळणार्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला आहे. आज आढळलेल्या आकडेवारीत पाथर्डी तालुका सर्वोच्च स्थानावर गेला आहे तर इतर तालुके शंभरच्या आतमध्ये आहेत.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 188, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 308 तर अँटीजेन चाचणीत 362 असे 858 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- पाथर्डी 132, कर्जत 78, नगर ग्रामीण 61, श्रीगोंदा 60, नेवासा 59, संगमनेर 59, श्रीरामपूर 57, नगर शहर 54, राहुरी 49, पारनेर 47, कोपरगाव 39, अकोले 35, राहाता 35, शेवगाव 33, जामखेड 27, इतर जिल्हा 21 भिंगार 08, मिलटरी हॉस्पिटल 04 असे कोरोना बाधित आढळले आहे.
नागरिकांनी असाच संयम ठेवल्यास आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल. यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमासह शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज बुधवारी दरदिवशी आढळणार्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला आहे. आज आढळलेल्या आकडेवारीत पाथर्डी तालुका सर्वोच्च स्थानावर गेला आहे तर इतर तालुके शंभरच्या आतमध्ये आहेत.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 188, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 308 तर अँटीजेन चाचणीत 362 असे 858 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- पाथर्डी 132, कर्जत 78, नगर ग्रामीण 61, श्रीगोंदा 60, नेवासा 59, संगमनेर 59, श्रीरामपूर 57, नगर शहर 54, राहुरी 49, पारनेर 47, कोपरगाव 39, अकोले 35, राहाता 35, शेवगाव 33, जामखेड 27, इतर जिल्हा 21 भिंगार 08, मिलटरी हॉस्पिटल 04 असे कोरोना बाधित आढळले आहे.
नागरिकांनी असाच संयम ठेवल्यास आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल. यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमासह शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.