Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

जायकवाडीचे 27 दरवाजे उघडले

89 हजार क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग

पैठण । वीरभूमी- Sep 30, 2021 • 12:00 AM 4062 views
अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठा 98.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे धरणाच्या 27 दरवाजातून तबबल 89 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

गोदावरी नदी पात्रात 1 लाख 16 हजार क्युसेकपर्यंतचे पाणी सामावू शकते. मात्र जायकवाडी पाटबंधारेकडून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग 1 लाखांपर्यंत ठेवण्यात येणार असल्याने पात्र सोडून पाणी जाणार नाही. यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आल्याने नदी काठच्या ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे.

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर वरील धरणाचे पाणी जायकवाडी धरणाकडे पाण्याची आवक वाढून बुधवारी रात्री धरणातील पाणीसाठा 98.62 टक्क्यांवर गेल्याने रात्री 11.30 वाजता धरणाच्या 27 दरवाजातून तब्बल 89 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

धरणाच्या 27 पैकी 18 दरवाजे 4 फुटाने तर 9 दरवाजे अर्धा फुटांनी उघडण्यात आले आहे. धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने गोदावरी नदी पात्रात 1 लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणातून बुधवारी सकाळी 4 दरवाजातून पाणी सोडण्यात आल्यानंतर यात वाढ करत रात्री 11.30 पर्यंत 27 दरवाजातून 89 हजार क्युसेकने गदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. या अगोदर 2005 ते 2009 असे सलग पाच वर्षे धरण भरले होते.

2006 मध्ये धरण भरल्यानंतर तब्बल 2 लाख 54 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे 2019, 2020 आणि 2021 मध्येही सलग धरण भरल्याने विसर्ग करण्यात आला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply