Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना म्हणजे पैशाचा अपव्यय

समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांचे मत

नेवासा । वीरभूमी- Oct 26, 2021 • 12:00 AM 1489 views
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या वतीने सुरू झालेली मध्यान्ह भोजन योजना ही केवळ बांधकाम मजुरांच्या पैशाचा अपव्यय होणार आहे, असे मत समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांनी व्यक्त केले.

गेले एक तप नेवासा तालुक्यामध्ये बांधकाम मजूर व इतर मजुरांसाठी संघटनाचे काम करणार्‍या समर्पण फाउंडेशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन 2011 पासून चालू असलेल्या सर्व योजनांमध्ये मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांची केवळ प्रतारणा होत आहे.

मंडळाच्या भोंगळ व नियोजनशून्य कारभारामुळे नोंदीत कामगारांना नूतनीकरण कधी करावे, हे देखील कळत नाही. मंडळाचे कर्मचारी पाच वर्षांचा शिक्का मारून देतात आणि त्यामुळे कामगारांची पाच वर्षांसाठी आपले नूतनीकरण झाले आहे, अशी समजूत होते.

हे सर्व कामगार त्यामुळे बाद झालेले आहेत. अशा बाद कामगारांचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही मंडळाला तो सोडवता आलेला नाही.

अनेक बांधकाम कामगार दुर्दैवाने वेगवेगळ्या कारणाने मृत झालेले आहेत. त्यांच्या वारसांना विमा, तर सोडा साधी अंत्यविधीसाठी असलेली रक्कमही अद्याप मंडळाने दिली नाही. नोंदीत बांधकाम मजुरांचे असंख्य प्रश्न व योजना या मंडळाकडे प्रलंबित असताना मंडळाने मध्यान्ह भोजन योजनेसारखी अतिशय कुचकामी अशी योजना राबवण्याचा निर्णय घेतला हे संतापजनक आहे.

जो कामगार कामावर जातो, तो आपल्या व कुटुंबाच्या पोटाची तजवीज करण्यासाठी जात असतो. जेवण हे कल्याणकारी मंडळाकडून मिळावे, अशी कधीही बांधकाम मजूर यांची अपेक्षा आम्हाला दहा वर्षांत काम करताना आढळून आली नाही.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply