Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना म्हणजे पैशाचा अपव्यय

समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांचे मत

नेवासा । वीरभूमी- Oct 26, 2021 • 12:00 AM 1521 views
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या वतीने सुरू झालेली मध्यान्ह भोजन योजना ही केवळ बांधकाम मजुरांच्या पैशाचा अपव्यय होणार आहे, असे मत समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांनी व्यक्त केले.

गेले एक तप नेवासा तालुक्यामध्ये बांधकाम मजूर व इतर मजुरांसाठी संघटनाचे काम करणार्‍या समर्पण फाउंडेशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन 2011 पासून चालू असलेल्या सर्व योजनांमध्ये मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांची केवळ प्रतारणा होत आहे.

मंडळाच्या भोंगळ व नियोजनशून्य कारभारामुळे नोंदीत कामगारांना नूतनीकरण कधी करावे, हे देखील कळत नाही. मंडळाचे कर्मचारी पाच वर्षांचा शिक्का मारून देतात आणि त्यामुळे कामगारांची पाच वर्षांसाठी आपले नूतनीकरण झाले आहे, अशी समजूत होते.

हे सर्व कामगार त्यामुळे बाद झालेले आहेत. अशा बाद कामगारांचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही मंडळाला तो सोडवता आलेला नाही.

अनेक बांधकाम कामगार दुर्दैवाने वेगवेगळ्या कारणाने मृत झालेले आहेत. त्यांच्या वारसांना विमा, तर सोडा साधी अंत्यविधीसाठी असलेली रक्कमही अद्याप मंडळाने दिली नाही. नोंदीत बांधकाम मजुरांचे असंख्य प्रश्न व योजना या मंडळाकडे प्रलंबित असताना मंडळाने मध्यान्ह भोजन योजनेसारखी अतिशय कुचकामी अशी योजना राबवण्याचा निर्णय घेतला हे संतापजनक आहे.

जो कामगार कामावर जातो, तो आपल्या व कुटुंबाच्या पोटाची तजवीज करण्यासाठी जात असतो. जेवण हे कल्याणकारी मंडळाकडून मिळावे, अशी कधीही बांधकाम मजूर यांची अपेक्षा आम्हाला दहा वर्षांत काम करताना आढळून आली नाही.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply