Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

टोमॅटोच्या किंमती आणखी दोन महिने चढ्या राहणार

टोमॅटोच्या किंमती आणखी दोन महिने चढ्या राहणार

मुंबई । वीरभूमी- Nov 27, 2021 • 09:08 AM 933 views
अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून सध्या टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती आणखी दोन महिने चढ्या पातळीवर राहतील, असा अंदाज क्रिसिल रिसर्चने शुक्रवारी व्यक्त केला.

प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातील परिस्थिती इतकी भयानक’ आहे की, महाराष्ट्राच्या नाशिकमधून भाजीपाला पाठवला जात आहे. ऑक्टोबर- डिसेंबर या कालावधीत कर्नाटकात झालेल्या अतिवृष्टीमुळे (साधारणपेक्षा 105 टक्के जास्त) उभी पिके नष्ट झाली आहेत.

आंध्र प्रदेश (साधारणपेक्षा 40 टक्के जास्त) आणि महाराष्ट्रात (22टक्के) पाऊस झाला. ही राज्ये प्रमुख पुरवठादार आहेत. परिणामी 25 नोव्हेंबरपर्यंत 142 टक्क्यांनी किंमतीत वाढ झाली आहे. जानेवारीपासून मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून कापणी नंतरचे नवे पीक बाजारात येईपर्यंत आणखी दोन महिने किंमती चढ्या पातळीवर राहतील, असे क्रिसिल रिसर्चने म्हटले आहे.

सध्या टोमॅटो 47 रुपये किलो दराने विकला जात असून नवीन आवक सुरू झाल्यानंतर भाव 30 टक्क्यांनी घसरतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि गुजरात येथे झालेल्या अतिवृष्टीचा रब्बीतील बटाटा हंगामाला फटका बसला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply