Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

निळवंडेच्या 5177 कोटींच्या खर्चास सुधारीत मान्यता

माजी आ. वैभवराव पिचड यांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे आभार

अकोले । वीरभूमी- Feb 22, 2023 • 03:50 PM 1539 views

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या (निळवंडे धरण) 5 हजार 177 कोटी 38 लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे निळवंडे प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असल्याचे सांगतानाच या निर्णयाबद्दल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले आहेत.

निळवंडे प्रकल्पाची उच्चस्तरीय कालवे, पिंपरकणे उड्डाण पूल, माळेगाव उपसा सिंचन योजना ही कामे निधी अभावी रेंगाळली होती. ही कामे पूर्ण व्हावीत म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ. वैभवराव पिचड यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत निदर्शनास आणून दिले. सुधारित मान्यता मिळाल्यामुळे आता ही कामे मार्गी लागतील, असे वैभवराव पिचड यांनी सांगितले.

तालुक्यात प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची क्षमता 8 हजार 320 दलघफु असून धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. धरणात या पूर्वीच पाणी साठविण्यास सुरवात झाली असली तरी कालव्याची कामे अपूर्ण आहेत. त्या मुळे धरण पूर्ण होऊनही लाभ क्षेत्रास सिंचनाचा लाभ होत नाही.

धरणास 85 किमी लांबीचा डावा आणि 97 किमी लांबीचा उजवा कालवा आहे. या दोन्ही कालव्यातून 68 हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. 2027 पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील 182 गावांना सिंचनाचा लाभ होईल असे माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले.

ते पुढील म्हणाले की, पिंपरकणे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक गावांचा तुटलेला संपर्क पुन्हा सुरळीत होऊन त्या भागातील नागरिकांची दळणवळणाची सोय होणार आहे व राजूर ची बाजारपेठ फुलण्यास मदत होणार आहे. म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर  निळवंडे धरणाच्या उच्च स्तरीयउजव्या कालव्यामुळे अकोले तालुक्यातील अंबड, धामणगाव आवारी, वाशेरे, मनोहरपूर, कळस, सुगाव, पानसरवाडी, परखतपुर, धुमाळवाडी, नवलेवाडी, या भागाला पाणी मिळून तेथील शेती फुलणार आहे. 

माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या उच्च स्तरीय  उजव्या कालव्यामुळे ज्या भागांना पाणी मिळत नव्हते अशा भागांना आता पाणी मिळणार आहे. माजीमंत्री पिचड यांनी राज्यात ‘जलपुरुष’ म्हणून जी प्रतिमा तयार केलेली आहे ती खर्‍या अर्थाने या निमित्ताने पुन्हा झळाळून निघाली आहे, असे वैभवराव पिचड म्हणाले.

माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांचे निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply