Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना गुंडाळली

कृषी आयुक्तांचे जिल्हा कृषी अधिकारी यांना आदेश

अहमदनगर । वीरभूमी - May 08, 2020 • 12:00 AM 5412 views
वाटर बँक म्हणुन शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना कृषी विभागाने गुंडाळली आहे. तसेच रोहयो व जलसंधारण कार्यक्रमातंर्गत योजनांसाठी 2020-2021 अर्थसंकल्पिय निधीच्या केवळ 33 टक्के निधी उपलब्ध होणार असल्याने यापुढे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या नवीन कामे व नवीन आखणी करू नये आणि नवीन काम सुरू करू नये, असे निर्देश कृषी आयुक्तालयाने जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहेत.

याबाबत रोहयो व जलसंधारण विभागाचे सचिव यांनी पुणे विभागिय कृषी आयुक्त यांना दुरध्वनीद्वारे सुचना दिल्यानंतर आयुक्तालयाने कृषी अधिकारी यांना आदेश काढले आहेत.

रोहयो व जलसंधारण विभागाने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकर्‍याला टंचाईच्या काळात पाणी टंचाईची झळ कमी प्रमाणात बसत होती. या योजनेअंतर्गत शेकडो शेततळे निर्माण झाल्याने शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी फळ पिक लागवडीकडे वळाला होता. शेततळ्यातील पाण्याचा वापर अनेक शेतकरी ‘वाटर बँक’ म्हणुन करत आहेत. मात्र यापुढे निधीच उपलब्ध होणार नसल्याने शेतकर्‍यांना योजनेच्या लाभाला मुकावे लागणार आहे. यामुळे शेतकर्‍यांमधून नाराजीचा सुर निघत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply