अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू
पाथर्डी तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टेने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी हे शेतकर्यांच्या बांदावर जावून पंचनामे करत आहेत. तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहे.
कासार पिंपळगाव व परिसरात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतातील कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन, उडीद पिकांसह डाळिंब, संत्री, सीताफळ आदी फळपिके व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. कासार पिंपळगाव येथे तलाठी श्रीमती रमण शिंपले, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांच्यासह कृषी सहाय्यक हे शेतकर्यांच्या बांदावर जावून पंचनामे करत आहेत.
ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले त्या शेतकर्यांनी पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
कासार पिंपळगाव व परिसरात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतातील कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन, उडीद पिकांसह डाळिंब, संत्री, सीताफळ आदी फळपिके व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. कासार पिंपळगाव येथे तलाठी श्रीमती रमण शिंपले, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांच्यासह कृषी सहाय्यक हे शेतकर्यांच्या बांदावर जावून पंचनामे करत आहेत.
ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले त्या शेतकर्यांनी पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.