Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

ट्रान्सफार्मर बदलण्याची जबाबदारी ही महावितरणची

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आदेश; राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा

करंजी । वीरभूमी - Nov 02, 2020 • 12:00 AM 3541 views
ट्रान्सफार्मर बदलण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे. त्याची वाहतूक शेतकऱ्यांनी करायची नाही, असे स्पष्ट आदेश उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ना. तनपुरे यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ना. तनपुरे यांनी ग्रामस्थांच्या शेकडो समस्या जागेवरच सोडवल्या. यावेळी तनपुरे यांनी हे आदेश दिले.

ना. तनपुरे म्हणाले की, बिघाड झालेला ट्रान्सफार्मर किंवा जळालेला ट्रान्सफार्मर महावितरण विभागानेच काढून घ्यायचा आहे. त्याची वाहतूक करून तो दुरुस्त करून आणून त्याची सर्व जबाबदारी बसवून देण्यापर्यंत महावितरणनेच करावयाची आहे. शेतकरी याबाबत कोणतीही वाहतूक करणार नाहीत. याबाबत शेतकरी बांधवांनी बिनधास्त रहावे. तसेच महावितरणने तातडीने ट्रान्सफार्मर बदलावा. अन्यथा शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन ना. तनपुरे यांनी केले.

मिरी व शिंगवे येथे जनता दरबारामध्ये ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आली. रस्ते वीज व पाणी या प्रमुख विषयासह इतरही ग्रामस्थांनी अनेक समस्या मांडल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या समक्ष ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. त्यामुळे हा दरबार यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे शासकीय निधी मध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली. सध्या आमदार निधीही देण्यात अडचण येत आहे. त्यामुळेच रस्त्यांच्या निधीचे बिडीओ कडूनच नियोजन करण्यात येत आहे. महावितरणच्या बाबतीत बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, बहुतेक ठिकाणचे ट्रान्सफार्मर बदलण्याची गरज आहे. मागील काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी विज क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर हे खराब झाले आहेत. त्यामुळे खराब झालेल्या ठिकाणचे ट्रान्सफर बदलण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. गावठाण डीपी बाबत तातडीने निर्णय घेवुन तेथील ट्रान्सफार्मर बदलण्यात येतील.

वांबोरी चारीचे पाणी या भागात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी तनपुरे यांनी दिली. तनपुरे म्हणाले की, सध्या मुळा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच संबंधित विभागांशी संपर्क करून धरण ओव्हरफ्लो झाल्याबरोबर वांबोरी चारीला पाणी सोडणे सुरू केले. त्यामुळे या भागातील सुमारे ३९ गावांमधील शंभर तलाव वांबोरी चारीने शंभर टक्के भरले आहेत. आता सोडलेले पाणी हे कोणत्याही हिशोबात धरलेले नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे ६८० एम सीएफटी पाणी धरणात तसेच शिल्लक आहे. वेळेनुसार भविष्यकाळात काही महिन्याने पुन्हा आपण हे आपले हक्काचे पाणी पुन्हा एकदा सोडून आपल्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करणार असल्याचे तनपुरे यांनी यावेळी सांगितले.

जनता दरबारामध्ये कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून हा जनता दरबार भरवण्यात आला. मास्क काढू नका, सुरक्षित अंतर ठेवा, कोरोना बाबत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण भविष्यात पुन्हा ही लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन तनपुरे यांनी केले.

या कार्यक्रमावेळी पंचायत समीती सदस्य राहुल गवळी, सरपंच अमोल वाघ, जालींदर वामन, सुभाष गवळी, राजू तागड, राजुभाई दारूवाले, रंजीत भैया आदीसह गटविकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply