Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अहमदनगर- औरंगाबाद रेल्वे मार्गाचा होणार सर्व्हे

अहमदनगर- औरंगाबाद रेल्वे मार्गाचा होणार सर्व्हे

अहमदनगर । वीरभूमी - Feb 28, 2021 • 12:00 AM 2533 views
अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला उपयुक्त ठरणार्‍या अहमदनगर-औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या सर्व्हेसाठी मध्य रेल्वे मुंबईचे पथक दाखल होणार आहे. हा रेल्वे मार्ग अहमदनगर शनिशिंगणापूर, नेवासा, औरंगाबाद असा जाणार असल्याने औद्योगिकीकरणाबरोबरच तिर्थक्षेत्रांचाही विकास होण्यास मदत होणार आहे.

याबाबतच्या सर्व्हेसाठी मध्य रेल्वेचे हे पथक तीन दिवसांत अहमदनगर व औरंगाबाद जिल्हा तसेच मार्गावरील संभाव्य तालुक्यांचा आढावा घेणार आहे. पथक अहमदनगर, नेवासा तसेच शनिशिंगणापूर येथे जावून शनिशिंगणापूर येथील भाविकांशीही चर्चा करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांसंबंधी माहिती देऊन गती देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

या रेल्वे मार्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील औद्योगिकरणासह शनिशिंगणापूर, नेवासा, देवगड, प्रवरासंगम येथील तिर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच जालना, शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद रेल्वे स्टेशन, वाळूंज, सुपा, पुणे औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. यातून लाखो जणांना रोजगार मिळणार आहे.

अहमदनगर - औरंगाबाद रेल्वे मार्गाबरोबरच अहमदनगर - पुणे या रेल्वे मार्गामुळे पुणे ते औरंगाबाद हे अंतर चार तासाचे असणार आहे. या सर्व्हेसाठीही केंद्राकडे पत्र पाठविले असून शंभर वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या जालना - खामगाव रेल्वे मार्ग सर्वेक्षणाचेही आदेश निघाले आहेत.

सध्या औरंगाबादेतून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे आधी मनमाडला जाऊन परत मागे वळते. त्यात सात तास खर्ची पडतात. नवीन मार्ग अंमलात आला तर चार तासात पुणे गाठता येईल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply