Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पहाणी

अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पहाणी

शेवगाव । वीरभूमी- Mar 21, 2021 • 12:00 AM 1456 views
शेवगाव-पाथर्डी तालुक्यामध्ये दि. 20 रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वार्‍यासह गारीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी आज सकाळी केली.

यावेळी शंकरराव काटे, अर्जुन काटे, भानुदास पालवे, सदाशिव विघ्ने, ज्ञानेश्वर गोर्डे, अशोक काकडे, महादेव डोंगरे, रामनाथ काटे, विठ्ठल मराठे, नितीन पायघन, मोहनराव कातकडे, सुरेश पायघन, प्रकाश वैरागळ, भाऊराव शिंदाडे, एकनाथ पायघन, बापूसाहेब पायघन, भाऊसाहेब मराठे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. काकडे म्हणाले की, दि.20 रोजीच्या अवकाळी वादळ वार्‍यासह गारांच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, कांदे, बाजरी यासह पपई, पेरू, आंबा आदी फळबागांचाही समावेश आहे. सध्या सर्वत्र मका, गहू, हरभरा, बाजरी काढणीला आले होते. परंतु काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. पंचनामे करताना मंडलानुसार नुकसान भरपाई हा निकष बाजूला ठेवून प्रत्यक्ष गटानुसार पाहणी करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणीही यावेळी अ‍ॅड. काकडे यांनी केली.

बँकेकडून अथवा पाहुण्या रावळ्यांकडून पैसे घेऊन बियाणे, पेरणी, लागवड, खते आदी वर मोठ्या प्रमाणात खर्च करून पिकांची मुलाप्रमाणे काळजी घेऊन वाढवले होते आणि आता झालेल्या वादळी वार्‍यामुळे काढणीला आलेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे बापूसाहेब पायघन यांनी सांगितले.

तर जनशक्ती विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संजय आंधळे म्हणाले की, मागील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे अजूनही काही भागात नुकसान भरपाई मिळाली नाही आणि अशातच काल झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले पीक शेतकर्‍यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply