राहुरीत अपहरण करून पत्रकाराची हत्या
जिल्हाभरातून घटनेचा तीव्र निषेध । आरोपींना अटक करण्याची मागणी
नगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे मंगळवारी काही इसमांनी मारहाण करत स्कार्पिओ गाडीतून अपहरण केले होते. आज त्यांचा राहुरी कॉलेज रोडला मृतदेह आढळून आला.
या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. जिल्ह्यातील पत्रकार संघटना व सामाजिक संघटनांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे मंगळवार दुपारी 12 वाजेच्या दरम्यान अपहरण करण्यात आले होते.
पत्रकार दातीर हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करत त्यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवले आणि निघून गेले. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता.
पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन दातीर यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. त्याच रात्री राहुरी कॉलेज रोडला रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आहले.
दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. रोहिदास दातीर यांनी आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र पत्रकाराची हत्या झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेचा निषेध करून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. जिल्ह्यातील पत्रकार संघटना व सामाजिक संघटनांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे मंगळवार दुपारी 12 वाजेच्या दरम्यान अपहरण करण्यात आले होते.
पत्रकार दातीर हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करत त्यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवले आणि निघून गेले. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता.
पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन दातीर यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. त्याच रात्री राहुरी कॉलेज रोडला रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आहले.
दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. रोहिदास दातीर यांनी आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र पत्रकाराची हत्या झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेचा निषेध करून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.