Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

एसआरपीएफ मधून राज्य पोलिस दलात बदलीची अट शिथील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय

मुंबई । वीरभूमी- May 12, 2021 • 12:00 AM 1646 views
मुंबई राज्य राखीव पोलिस बलातून (एसआरपीएफ मधून) राज्य पोलिस दलात बदलीसाठी असलेल्या अटीमध्ये राज्य शासनाने बदल केला आहे. यामध्ये बदलीसाठी आवश्यक असलेल्या सेवेची 15 वर्षाची अट शिथील करण्यात आली आहे. ती अट आता 12 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

या निर्णयामुळे राज्य राखीव बलातून राज्य पोलिस दलात येणार्‍या इच्छुकांचा मार्ग मोकळा होणार असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

दिवसेंदिवस राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा वाढता कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची 15 वर्षांची अट शिथील करून 12 वर्षे करण्याचा व प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

तसेच राज्य राखीव पोलिस बलातून राज्य पोलिस दलात बदली झाल्यानंतर पहिली 5 वर्षे जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजवावे लागत होते. या अटीमध्येही शिथीलता आणली असून यापुढे बदली नंतर जिल्हा पोलिस दलात 2 वर्षे कर्तव्य बजवावे लागणार आहे. यानिर्णयामुळे राज्य पोलिस दलात मनुष्यबळ वाढून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply