Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कोविड नियमाचे पालन करत ग्रामसभा होणार

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे आदेश

अहमदनगर । वीरभूमी- Aug 14, 2021 • 12:00 AM 1896 views
तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच ग्रामस्तरावर होणार्‍या ग्रामसभांना परवानगी मिळाली आहे. मात्र ग्रामसभा कोविडचे नियम पाळूनच घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या आहेत. याबाबत शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशामुळे दि. 15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार्‍या ग्रामसभांना केवळ 200 जणांची उपस्थित राहील, असा नियम आदेशात आहे. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ग्रामविकासासाठी महत्वाची असलेल्या ग्रामसभा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी ग्रामविकासाला खीळ बसली आहे. ग्रामविकासासाठी ग्रामसभांना परवानगी द्यावी अशी मागणी प्रत्येक गावातील विरोधकांची मागणी होती. मात्र कोरोना संसर्गामुळे परवानगी देण्यात आली नव्हती.

मात्र शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने एक आदेश काढून दि. 15 ऑगस्ट पासून ग्रामसभांना परवानगी दिली आहे. मात्र ग्रामसभा घेतांना कोविड नियमाचे पालन करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून थांबविण्यात आलेल्या ग्रामीण स्तरावरील ग्रामसभा दि. 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी याबाबत आदेश जारी केला.

दि. 15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी ग्रामसभा सोशल डिस्टंसिंग, ग्रामसभेला येणार्‍यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. ग्रामसभेसाठी 200 जणांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply