Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

कोविड नियमाचे पालन करत ग्रामसभा होणार

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे आदेश

अहमदनगर । वीरभूमी- Aug 14, 2021 • 12:00 AM 1867 views
तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच ग्रामस्तरावर होणार्‍या ग्रामसभांना परवानगी मिळाली आहे. मात्र ग्रामसभा कोविडचे नियम पाळूनच घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या आहेत. याबाबत शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशामुळे दि. 15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार्‍या ग्रामसभांना केवळ 200 जणांची उपस्थित राहील, असा नियम आदेशात आहे. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ग्रामविकासासाठी महत्वाची असलेल्या ग्रामसभा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी ग्रामविकासाला खीळ बसली आहे. ग्रामविकासासाठी ग्रामसभांना परवानगी द्यावी अशी मागणी प्रत्येक गावातील विरोधकांची मागणी होती. मात्र कोरोना संसर्गामुळे परवानगी देण्यात आली नव्हती.

मात्र शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने एक आदेश काढून दि. 15 ऑगस्ट पासून ग्रामसभांना परवानगी दिली आहे. मात्र ग्रामसभा घेतांना कोविड नियमाचे पालन करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून थांबविण्यात आलेल्या ग्रामीण स्तरावरील ग्रामसभा दि. 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी याबाबत आदेश जारी केला.

दि. 15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी ग्रामसभा सोशल डिस्टंसिंग, ग्रामसभेला येणार्‍यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. ग्रामसभेसाठी 200 जणांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply