Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

श्रीरामपूर । वीरभूमी- Sep 20, 2021 • 12:00 AM 2319 views
खेळतांना शेततळ्यात उतरलेल्या तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगतच्या कान्हेगाव येथे घडली.

या दुदैवी घटनेत चैतन्य अनिल माळी (वय 12), दत्ता अनिल माळी (वय 8) व चैतन्य शाम बर्डे (वय 4) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ही तीनही मुले गरीब कुटुंबातील असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगत असलेल्या कान्हेगाव येथील शेततळ्याजवळ चैतन्य माळी, दत्ता बर्डे व चैतन्य बर्डे ही तीन लहान मुले खेळत होती. खेळत असतांना ते शेततळ्याच्या पण्यात उतरली.

शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीघेही पाण्यात बुडून मयत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांचे कुटुंबिय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

तीनही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply