Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

या दिवशी होणार गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक

आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची माहिती

कोपरगाव । वीरभूमी- Nov 25, 2021 • 09:31 PM 806 views
गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवार (दि. 29) रोजी कोपरगाव व राहाता येथे होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

त्यानुसार डाव्या कालव्याची बैठक ही सोमवार (दि.29) रोजी सकाळी 10.00 वाजता आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे होणार आहे. तसेच उजव्या कालव्याची बैठक दुपारी 3.30 वाजता राहाता येथे होणार आहे.

मागील पाच वर्षात कालवा सल्लागार समितीच्या बैठका मुंबईला घेतल्या जात असल्यामुळे गोदावरी कालव्याचे लाभधारक शेतकरी याबैठकींसाठी उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे आवर्तन व आवर्तनाबाबत येणार्‍या अडचणी शेतकर्‍यांना मांडता येत नव्हत्या.

मात्र आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी लाभधारक शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घेण्याचा शब्द पूर्ण करून या बैठका लाभ क्षेत्रात होत आहे. त्यामुळे मागील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीवेळी अनेक शेतकर्‍यांना उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडता आल्या होत्या.

यावेळी देखील लाभधारक शेतकर्‍यांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply