Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

बालमटाकळीत व्यंकटेशकडून हमीभाव केंद्र सुरु

हमीभाव केंद्रामुळे शेतकर्‍यांची परवड थांबणार ः हभप. बाबा गिरी महाराज

बोधेगाव । वीरभूमी- Nov 25, 2021 • 09:39 PM 735 views
आजकाल जो तो फक्त स्वार्थासाठी जीवन जगत असतांना व्यंकटेश ग्रुपचे संचालक यांनी मात्र आपली समाजाप्रती असलेली नाळ आणि सामाजिक बांधिलकी साबुत ठेवली आहे.

त्यांनी समाजोपयोगी विविध कार्यक्रमाबरोबर आज शासनाने ठरून दिलेल्या शासकीय हमीभाव केंद्र बोधेगाव- बालमटाकळी सारख्या ग्रामीण भागात सुरु केल्याने शेतकर्‍यांची शेवगावला जाण्या-येण्यासाठी होणारी परवड थांबणार आहे, असे मत केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबा गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना गिरी महाराज म्हणाले की, शेतकरी उत्पादन घेत असताना उत्पादन आणि खर्च याचा हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्याने त्याच्या खर्चाचे बजेट कोलमडले जाते. शेतकर्‍यांना शासकीय हमिभावाप्रमाणे धान्याला दर मिळाला तर त्याला शासकीय आनुदान आणि विम्याची गरज रहाणार नाही.

परंतु हमीभावाप्रमाणे त्याला क्वचितच दर मिळाला जातो. शेअर बाजारातील सेंसेक्स वाढला तर झळाळी आली म्हणतात आणि शेतकर्‍यांच्या मालाचा दर वाढला तर त्याला महागाई म्हणतात अशी शोकांतीका शेतकर्‍यांची आहे. भविष्यात गोर-गरिब अंध परित्यक्ता यांच्या मदतीसाठी प्रयत्न कराण्याचे अवाहन महंत बाबागिरी महाराज यांनी केले.

यावेळी चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी सांगितले कि, व्यंकटेशचे दोन लाख सभासद आहेत. समाजोपयोगी अनेक कार्यक्रम आम्ही व्यंकटेश ग्रुपच्या माध्यमातून घेत आहोत. यामध्ये गोशाळा, शेतकर्‍यांसाठी शेती उपयोगी व्याख्याने, कार्यशाळा, उद्योग धंद्यासाठी नवनविन संकल्पना मार्गदर्शन, दाळ मिल, आणि आता शासकीय हमिभाव केंद्राचे उद्घाटन केले असुन समाजासाठी आपण काहितरी देनं लागतो म्हणून भविष्यात त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

साईधामच्या मागे जुना हातगाव रस्त्यालगत असलेल्या शासकीय हमिभाव केंद्राचे उद्घाटन केदारेश्वरचे मठाधिपती महंत बाबा गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी मोहनराव देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणुन प्रभाकर काका हुंडेकरी उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब देशमुख, रामनाथ राजपुरे, सुधाकर तहकीक, प्रशांत देशमुख, ज्ञानदेव घोरतळे, भारत पठाडे, विक्रम बारवकर, भारत देशमुख, संदिप बामदळे, मधुकर पाटेकर सह व्यंकटेश उद्योग समुहाचे चेअरमन अभिनाथ शिंदे, संचालक व्यंकटराव देशमुख, अनिल गुंजाळ, कृष्णा मसुरे अभंग मनोज शेतकरी बप्पासाहेब भाकरेसह परिसरातील उडीद, मुग, तुर घालण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply