Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

गोदावरी नदीवरील वारी पुलासाठी २० कोटी निधी मंजूर

मा.आ. अशोकराव काळे यांचे स्वप्न आ. आशुतोष काळेंनी केले पूर्ण

कोपरगाव । वीरभूमी- Dec 22, 2021 • 06:32 PM 920 views
माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील धारणगाव-कुंभारी, चासनळी, कोपरगाव शहरातील बेट भागाला जोडणारा पूल, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील जुन्या पुलाला समांतर पूल असे गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी मोठे पूल बांधण्यात यश मिळविले.

त्याप्रमाणे वारी येथे देखील गोदावरी नदीवर पूल बांधण्यासाठी त्यांचा मनोदय होता व त्यासाठी पाठपुरावा देखील सुरु होता. मात्र २०१४ ला झालेल्या सत्तांतरामुळे या पुलाकडे दुर्लक्ष झाले. गोदावरी नदीवरील वारी पुलाचे मा.आ.अशोकराव काळे यांचे स्वप्न अपूर्ण राहून नागरिकांचे वर्षानुवर्षापासून सुरु असलेले हाल अजूनही सुरूच होते. याची श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दखल घेऊन या पुलासाठी निधी मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात वारी येथील गोदावरी नदीवरील पुलासाठी तब्बल २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील (प्रजिमा १३ वरील) सावळीविहीर, रुई, वारी-कान्हेगाव, सडे, शिंगवे, भोजडे, शिरसगाव, सावळगाव आदी गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वारी येथील गोदावरी नदीच्या पुलाचा प्रश्न मागील पाच-सहा दशकांपासून प्रलंबित होता. पावसाळ्यात गोदावरी नदीचा विसर्ग वाढल्यानंतर पुलावर पाणी येऊन दोनही बाजूंची वाहतूक ठप्प होत असे. त्याचबरोबर जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत होते किंवा दूरच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असे.

तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डी येथे साई पालख्यांसमवेत येणाऱ्या हजारो साईभक्तांची देखील या पुलामुळे गैरसोय होत होती. त्यामुळे हा पूल व्हावा अशी अनेक वर्षापासूनची वारी व पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी होती. हि मागणी माजी आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र २०१४ ला सत्तांतर झाल्यामुळे वारी पुलाचा प्रश्न प्रलंबितच होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी वारी येथील पुलाचा प्रश्न सोडविणार असल्याचे वारीसह परिसरातील नागरिकांना आश्वासित केले होते. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा चालू होता.

त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले आहे. सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने या पुलासाठी २० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे आभार मानले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply