Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

शाळांबाबत 15 दिवसांत निर्णय

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे संकेत

जालना । वीरभूमी - Jan 17, 2022 • 12:40 PM 974 views
राज्यातल्या बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, तिथे अपडेट घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिले.

राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या नगण्य असताना शाळा बंद करणे, विद्यार्थ्यांचं अगोदरच मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं असताना शाळेला टाळं लावणं योग्य नसल्याचं मत अनेक पालक व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.

कोरोनाच्या वाढणार्‍या केसेस पाहून राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्क्यांच्या क्षमतेने शाळा पुन्हा सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर आढावा घेऊन यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, असं टोपे यांनी म्हटल आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply