Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज

पंजाब डख । काही भागात ढगाळ वातावरण, तापमानातही वाढ होण्याचा अंदाज

अहमदनगर । वीरभूमी - Apr 19, 2022 • 09:00 AM 1583 views
राज्यातील काही जिल्ह्यात दि. 22 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान तुरळक पाऊस पडणार आहे. तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहुन उष्णतेचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी या आठवड्याचा अंदाज वर्तविला असून यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यात दि. 22 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यासह कोकणपट्टी भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

तर राज्यातील इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच राज्यातील तापमान 38 अंश ते 45 अंश पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे राज्यात या आठवड्यातही उष्णतेचा पारा चढताच राहणार असल्याचा अनदाज व्यक्त केला आहे.

ज्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला त्या भागातील शेतकर्‍यांनी आपल्या कांदा, हळद, मका, हरभरा, ज्वारी, द्राक्ष, टरबूज आदी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.

तसेच वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येकाने स्वतःची व लहान मुलांची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply