Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

त्या आमदार, खासदारांवर काय कारवाई केली?

ईडीच्या अधिकार्‍यांवर कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबई । वीरभूमी - Dec 09, 2022 • 03:36 PM 1510 views
ईडीच्या रडावर असलेले आमदार व खासदार यांनी शिंदे गटात जावून भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर ईडीने अशा आमदार व खासदारांवर काय कारवाई केली? असा सवाल करत ईडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून ही जनहित याचिका वरीष्ठ वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

ईडीने आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आ. यामिनी जाधव, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना समन्स बजावले होते. दरम्यान शिवसेनेत फूट पडून हे आमदार व खासदार शिंदेगटात दाखल झाल्यानंतर भाजपाशी हातमिळवणी केली.

भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर या आमदार व खासदारांवर ईडीकडून कोणतीही कारवाई केलेली नाही. या कारवाईचा अहवाल ईडीकडून मागविण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

अशा आमदार व खासदारांवर कारवाई न करणार्‍या ईडीच्या अधिकार्‍यांवरच फैजदारी कारवाई करावी, अशी मागणी याचिकाकर्ते वरीष्ठ वकील नितीन सातपुते यांनी केली आहे.

या याचिकेची पुढील सुनावणी 15 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. मात्र या याचिकेमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply