Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अतिवृष्टीने नुकसान ः नगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा पहिला हप्ता

किमान 33 टक्के नुकसान झालेल्या पिकांना मिळणार नुकसान भरपाई

अहमदनगर । वीरभूमी - Nov 09, 2020 • 12:00 AM 2535 views
जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी राज्यातील विविध जिल्ह्यासाठी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशात नगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे म्हटले आहे.

राज्यातील विविध भागात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व फळ पिकांचे नुकासान झाले आहे. या नुकसानीची शासनस्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मंत्र्यांनी पाहणी केली होती. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या.

त्यानंतर तातडीने मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत दिवाळी अगोदर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शेतीपिकांसाठी हेक्टरी 10 हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी 25 हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना मदत देतांना शिक्षक-पदवीधरच्या निवडणुकीचा अडसर निर्माण होतो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज राज्य सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यातील मदत देण्याची घोषणा शासन निर्णय पारित करून जाहीर केली.

राज्यातील विविध जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र ही मदत देतांना सरसकट ऐवजी 33 टक्के नुकसानग्रस्त पिकांना मिळणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply