Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

राज्यातील वाहन चालकांची दिवाळी गोड होण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी

सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी

कोपरगाव । वीरभूमी - Nov 09, 2020 • 12:00 AM 905 views
कोरोना काळात दळणवळण बंद असल्याने राज्यातील तमाम वाहन चालकांना स्वतःसह कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागला. लॉकडाउन काळात सर्वाधिक फटका बसलेल्या या घटकाला खर्‍या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. सणासुदीच्या काळात चालकांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्यातील सर्वच वाहन चालकांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपाच्या सचिव, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

जगासह, देशभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातही लॉकडाउन करण्यात आले होते. मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दळणवळण पूर्णपणे थांबलेले होते. या कालावधीमध्ये राज्यभरातील असंख्य चालकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली. यामध्ये रस्त्यावर धावणार्‍या हजारो वाहनचालकांचा समावेश आहे.

रिक्षाचालक, ट्रक चालक, इतर विविध वाहनांच्या चालकांचा रोजगार पुर्णपणे बंद झाल्याने या घटकाला स्वतःसह कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहेे. अनेक कुटूंबे या परिस्थितीमुळे उध्दवस्त झाले आहे. अनेकांना अविचाराने ग्रासले असुन या संकटातून मार्ग काढणे मुश्कील झाले आहे. आर्थीक विवंचनेत असणार्‍या चालकांना ही समस्या आजही भेडसावत आहे.

दिवाळी सारखा सण तोंडावर आला असल्याने कुटूंबासह वाहन चालक हतबल झालेले आहेत. चालक हा बाजारपेठेचा प्रमुख घटक असुन कोरोनाच्या या परिस्थितीत चालकांच्या नशिबी आलेली अवस्था दुदैवी असून त्यांना शासनाने आर्थीक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply