Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध वाढले

विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांना 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा

मुंबई । वीरभूमी- Dec 31, 2021 • 12:52 AM 1873 views
वाढता कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचा धोका विचारात घेवून राज्य सरकारने राज्यातील निर्बंध वाढविण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढल्यानंतर आज मध्यरात्री (30 डिसेंबर रोजी) नवीन आदेश काढून लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांसाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.

राज्यात ओमायक्रॉन व कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री व संबधित मंत्री यांनी टास्क फोर्सबरोबर बैठक घेतली होती. या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.

याबाबत गुरुवारी मध्यरात्रीपासून गर्दी आटोक्यात आणण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढले आहेत. या आदेशानुसार विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मीक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम अशा सोहळ्यांना 50 लोकांची उपस्थित तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पर्यटनस्थळावर जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याबाबत मुभा देण्यात आली आहे.

वाढत्या कोरोना बाधितांची संख्या विचारात घेऊन राज्यात लवकरच कडक निर्बंध लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने समारंभाच्या उपस्थितीती बाबत निर्बंध जाहीर करण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांवर कलम 144 नुसार कारवाई करण्याचा इशाराही आदेशात दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply