Skip to content
Breaking Live
कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध वाढले

विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांना 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा

मुंबई । वीरभूमी- Dec 31, 2021 • 12:52 AM 1826 views
वाढता कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचा धोका विचारात घेवून राज्य सरकारने राज्यातील निर्बंध वाढविण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढल्यानंतर आज मध्यरात्री (30 डिसेंबर रोजी) नवीन आदेश काढून लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांसाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.

राज्यात ओमायक्रॉन व कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री व संबधित मंत्री यांनी टास्क फोर्सबरोबर बैठक घेतली होती. या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.

याबाबत गुरुवारी मध्यरात्रीपासून गर्दी आटोक्यात आणण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढले आहेत. या आदेशानुसार विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मीक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम अशा सोहळ्यांना 50 लोकांची उपस्थित तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पर्यटनस्थळावर जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याबाबत मुभा देण्यात आली आहे.

वाढत्या कोरोना बाधितांची संख्या विचारात घेऊन राज्यात लवकरच कडक निर्बंध लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने समारंभाच्या उपस्थितीती बाबत निर्बंध जाहीर करण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांवर कलम 144 नुसार कारवाई करण्याचा इशाराही आदेशात दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply