Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कांदा व फळ पिकाला नुकसान भरपाई द्यावी

भाजपाचे युवा नेते बंडू पाठक यांची मागणी

करंजी । वीरभूमी- Jan 01, 2022 • 09:25 PM 712 views
गेल्या काही दिवसापासून वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलाने व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कांदा आणि फळ पिकाला राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे युवा नेते व सेवा सोसायटीचे चेअरमन बंडू पाठक यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊन मुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आला आहे. शेतीच्या कोणत्याही उत्पादनाला भाव मिळत नाही. यावर्षी सततच्या होणार्‍या पावसामुळे कांदा पिकावर मोठा रोग पडून कांद्याचे 85 टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने पाहणी करून त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाठक यांनी शासनाकडे केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये व खास करून दुष्काळी भागामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उत्पादन घेतात. कांद्याला लागवडीचा खर्च सुमारे 15 हजार, खुरपणी 10 हजार रुपये, औषध फवारणी दहा हजार रुपये व काढणीला दहा हजार रुपये असा सुमारे प्रति एकर 45 हजार रुपये खर्च येतो.

आज हा खर्चही निघणे शक्य होत नाही. प्रति एकरी सुमारे 100 टन उत्पादन होत असताना आता ते दहा ते पंधरा टनापर्यंतच कांदा उत्पादन होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा व मोसंबी पिकाचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. फळ पिवळे पडणे, काळे होणे, कोळी रोगाचे प्रमाण वाढणे व झाडेही पिवळे पडणे असे अनेक रोग फळझाडांना होत आहेत.

त्यामुळे शेतकर्‍यांचे फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे शासनाने वीज कट करून जाणुन बुजुन आणलेले अस्मानी संकट यामुळे शेतकरी पूर्ण हताश झाला आहे.

या कारणाने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तातडीने या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पिक विम्याचे पैसे ही तातडीने द्यावेत, अशी मागणी बंडू पाठक यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply