Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

ऊसाला पाच हजाराचा दर मिळविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा

रघुनाथदादा पाटील । नेवासा येथे शेतकरी संघटनेची ऊस परिषद

नेवासा । वीरभूमी - Nov 09, 2023 • 12:30 PM 1055 views

आजचे साखरेचे व इथेनॉलचे दर बघता पाच हजार रुपये प्रति टन दर कसा देता येत नाही, याबाबत कारखानदारांनी व सरकारने समोरासमोर बसून चर्चा करावी. राज्यकर्त्यांनी शेतकरी लुटण्यासाठी स्व. शरद जोशींची शेतकरी संघटना फोडून खोत, पाशा पटेल, शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांना पद, प्रतिष्ठाचे प्रलोभन देऊन शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.

नेवासा येथे अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस परिषद उत्साहात पार पडली. त्यावेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते.

यावेळी संघषनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, त्रिंबक भदगले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील, शिवाजी नांदखेले, नरेंद्र काळे, हरिभाऊ तुवर, डॉ. रोहित कुलकर्णी, गणेश चौगुले, बद्री शिंदे, अमृत शिंदे, शिवाजी लाकडे, लक्ष्मण पाटील, बाबासाहेब नागोडे, किरण लंघे, अशोक नागोडे, विश्वास मते, विजय मते, भाऊसाहेब काळे, भारत गुंजाळ, गंगाराम तुवर, सागर लांडे, अ‍ॅड. बाळासाहेब कावळे, सोमनाथ औटी, दत्तात्रय निकम, कैलास नागोडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे शेतकर्‍यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. परिणामी, सिलोन व बीडची पुनरावृत्तीची वाट राज्यकर्त्यांनी पाहू नये. सिलोन व बीडमध्ये राज्यकर्त्यांची घरे जनतेने जाळली. शेतकर्‍यांनी ज्यांच्या खांद्यावर माना टाकल्या, त्यांनीच शेतकर्‍यांच्या माना कापण्याचे कामे केली. त्यामुळे चार मडकी फुटली म्हणून कुंभार रडत बसत नाही, नव्या जोमाने 40 मडके कुंभार तयार करतो. तसे नव्या जोमाने शेतकरी चळवळ वाढवण्याचे काम आम्ही करत आहोत.

कांद्यासारख्या पिकावर काँग्रेसने सातशे रुपये प्रति कि टल निर्यात मूल्य लावले होते. परंतु मोदी सरकारने त्यावर कळस करून आठशे रुपये प्रति क्विटल निर्यात मूल्य लावून कांद्याचे भाव वाढण्याचे काम केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे होत असलेली ऊस परिषद राज्याला दिशा देण्याचे काम करणार आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे एक टन उसाचे साखरेचे उपपदार्थाचे सात हजार दोनशे रुपये प्रति टन होतात. तर शेतकर्‍यांना पाच हजार रुपये देण्यास काय अडचण आहे. हवाई अंतराच्या अटीमुळे साखर कारखानदारी मध्ये ठराविक कुटुंबांची मक्तेदारी झाली आहे. बारा वर्षांपूर्वी सोयाबीनचे असलेले दर आजही तेच आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply