एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार
दागिने व मोबाईलसह पलायन । पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे घटना
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एजंटमार्फत पैसे देऊन आणलेल्या नवरीने लग्नानंतर अवघ्या काही तासांतच घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केल्याने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुसरे येथील २४ वर्षीय तरुणाचे जालना जिल्ह्यातील एका मुलीशी एजंटच्या मध्यस्थीने लग्न ठरविण्यात आले होते. यासाठी मुलीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम देण्यात आली होती.
३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी विधिवत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नववधू सुसरे येथील नवरदेवाच्या घरी दाखल झाली. घरात पारंपरिक शुभविधी पार पडले आणि नव्या संसाराच्या सुरुवातीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास नववधूने घरातील मोबाईल, एक तोळ्याची पोत तसेच नवरदेवाचे एक तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले.
सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेव व नातेवाईकांनी तातडीने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील विवाह व्यवस्थेतील अडचणी आणि एजंटमार्फत होणाऱ्या विवाहातील धोके पुन्हा समोर आले आहेत. सामाजिक अडचणींचा गैरफायदा घेत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून संबंधित नववधू व एजंटचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुसरे येथील २४ वर्षीय तरुणाचे जालना जिल्ह्यातील एका मुलीशी एजंटच्या मध्यस्थीने लग्न ठरविण्यात आले होते. यासाठी मुलीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम देण्यात आली होती.
३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी विधिवत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नववधू सुसरे येथील नवरदेवाच्या घरी दाखल झाली. घरात पारंपरिक शुभविधी पार पडले आणि नव्या संसाराच्या सुरुवातीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास नववधूने घरातील मोबाईल, एक तोळ्याची पोत तसेच नवरदेवाचे एक तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले.
सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेव व नातेवाईकांनी तातडीने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील विवाह व्यवस्थेतील अडचणी आणि एजंटमार्फत होणाऱ्या विवाहातील धोके पुन्हा समोर आले आहेत. सामाजिक अडचणींचा गैरफायदा घेत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून संबंधित नववधू व एजंटचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.