मढी ग्रामपंचायतीचा ग्रामसेभेमध्ये ठराव
पाथर्डी । वीरभूमी- 23-Feb, 2025, 01:58 PM
पुढील महिन्यापासून सुरू होणार्या मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये यंदा मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालावी असा ठराव ग्रामसभेने संमत केला असून यामुळे संपूर्ण राज्यांमध्ये मढी यात्रेचा विषय चर्चेला आला आहे. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून सर्व जाती धर्मासह अठरापगड जातीच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून यापूर्वी यात्रेकडे बघितले जात होते.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मढीची यात्रा अठरापगड जातींच्या भाविकांचे कुलदैवत म्हणून कानिफनाथांकडे बघितले जाते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा चालून पूर्वी भटक्यांच्या जातपंचायत संपन्न होत होत्या आज सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी त्यांच्याकडे विविध गावांच्या भाविकांच्या आलेल्या पत्राची दखल घेत ग्रामसभेपुढे विषय मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले एक महिन्यावर यात्रा आली असून बर्याच भाविकांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत. पारंपारिक पद्धती नुसार देवाला महिनाभर अगोदर तेल लागलेले असते असा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुःखवट्याचा असतो.
या काळात ग्रामस्थ तळण लग्नकार्य शेतीकामे प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग गादी सुद्धा वापरत नाहीत महिनाभर कौटुंबिक सर्व कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात येथे येणारी व्यापारी या परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे हिंदूंच्या भावनांना ठेच बसल्यासारखे वातावरण झाले आहे. कुंभमेळ्याच्या धरतीवर मुस्लिम व्यापार्यांना बंदी केली तशी ग्रामसभेच्या ठरावांमध्ये मुस्लिम व्यापार्यांना मढी यात्रेमध्ये बंदी करण्यात आली आहे जो माणूस कुंकू लावत नाही त्यांनी आम्हाला कुंकू विकावे, एवढी दुर्भाग्याची गोष्ट हिंदू धर्मासाठी म्हणावी लागेल.
मुस्लिम व्यापार्यांचे दोन नंबरचे व्यवसाय सुरू असतात सोरट, चक्री, मांस विक्री, अमली पदार्थ, चालू असून यात्रेमध्ये यातुन भाविकांची लूट होते प्रसंगी भाविकांना मारहाण झाली आहे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण होते त्यांच्या पत्राप्रमाणे ग्रामसभेने असा ठराव संमत केला असल्याचे सरपंच मरकड म्हणाले.
भाविकांनी दिलेल्या पत्रामध्ये मुस्लिम समाजास यात्रेत दुकान लावण्यात बंदी करावी त्यांच्याकडील खाद्यपदार्थ व प्रसादाची साहित्य घ्यावे लागते खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारे दूषित करून हिंदूंच्या भावना दुखावतात काही बोलण्यास गेलो तर हमरी तुमरी वर येतात यात्रेत मटका व चक्री चालून लूटमार करतात अशा स्वरूपाचे भाविकांचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे त्यानुसार मढी यात्रेत मुस्लिम व्यापार्यांना बंदी करण्याचा ग्रामसभेचा ठराव आज सर्वांमध्ये पारित करण्यात आला.
या ठरावाला सूचक म्हणून रमेश मरकड तर अनुमोदक म्हणून बाबासाहेब नाना मरकड यांचे नाव असून ठरावाच्या अधिकृत प्रतीवर सरपंच संजय मरकड व ग्रामसेवक अनिल लवांडे यांच्या सह्या आहेत. या यात्रेचा परिणाम मायंबा येथील यात्रेवर सुद्धा होऊ शकतो कारण मढी व मायंबाची यात्रा एकाच वेळी भरते.
sgwwcv